1 minute reading time
(62 words)
[NavaRashtra]सरन्यायाधीशांचं अपमान प्रकरण संसदेत मांडणार, सुप्रिया सुळे आक्रमक
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हा देश संविधानानुसार चालतो. समाजात निर्माण झालेली दरी का वाढत आहे, यावर आता आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. सरन्यायाधीश हे लोकशाहीचे सर्वोच्च पद असून, त्यांच्यावर असा हल्ला होणे अत्यंत निंदनीय आणि काळा दिवस म्हणावा लागेल." त्या पुढे म्हणाल्या, "भूषण गवई हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत. त्यांच्या बाबतीत झालेली ही घटना देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची अधोगती दर्शवते."

