2 minutes reading time (338 words)

[Maharashtra Times]आरक्षणाबाबत आयोगाकडे बोट; लोकसभेत सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला महाराष्ट्राचा मुद्दा

आरक्षणाबाबत आयोगाकडे बोट; लोकसभेत सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला महाराष्ट्राचा मुद्दा

लोकसभेत मंगळवारी निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली. यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यावेळी सुळे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. 'आरक्षणावर आक्षेप घेतल्यानंतर निम्म्या ठिकाणच्या निवडणुका रद्द झाल्या. २४२ नगर परिषदांपैकी ५७ ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली, तेव्हा निवडणूक आयोग काय करत होता,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या आयोगाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात वारंवार सापडत आहे,' असा आरोप त्यांनी केला. निवडणूक खर्च, मतदारयाद्या, व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी, निवडणूक खर्च, पैशांचे खुलेआम वाटप, अधिकाऱ्यांच्या राजकीय हेतूने होणाऱ्या बदल्या अशा मुद्द्यांवर त्यांनी सरकारला घेरले. 'निवडणूक सुधारणांची सुरुवात निवडणूक आयोगापासूनच झाली पाहिजे व निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात,' अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांनी केली. 'मतदारयाद्यांची विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) म्हणजे छुपे राष्ट्रीय नागरिक नोंदणी असल्याचा आरोप करताना, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची पद्धत बदला, एसआयआर थांबवा, पैसेवाटप थांबवा,' अशाही मागण्या विरोधी नेत्यांनी केल्या. या चर्चेत राहुल गांधी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करून, 'देशातील घटनात्मक संस्थांवर थेट कब्जा केला जात आहे,' असा आरोप केला. 'इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांबद्दल अनेक प्रश्न जगभरातील इतर देशांमध्येही उपस्थित केले जात आहेत,' असे ते म्हणाले. गृहमंत्री अमित शहा या चर्चेला बुधवारी उत्तर देणार आहेत.

आयोगावर कब्जा : राहुल गांधी
भाजप-संघ परिवाराने निवडणूक आयोगावरही कब्जा केला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांनी निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या प्रक्रियेवर शंका व्यक्त करताना या निवड समितीमधून सरन्यायाधीशांना हटविण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीच्या ४५ दिवसांनंतर निवडणूक आयोगाला सीसीटीव्ही फूटेज नष्ट करण्याची परवानगी देणारा कायदा का आणण्यात आला, हा 'निवडणूक चोरीचा' प्रकार आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर भारतातील संस्था पूर्णपणे ताब्यात घेणे हे संघाचे पुढचे पाऊल होते, असा आरोप त्यांनी केला. यानंतर प्रचंड गदारोळ झाला.

...

supriya sule slams election commission over maharashtra poll irregularities in lok sabha sir debate ; आरक्षणाबाबत आयोगाकडे बोट; लोकसभेत सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला महाराष्ट्राचा मुद्दा | Maharashtra Times

Supriya Sule Slams Election Commission : लोकसभेत मंगळवारी निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली. यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यावेळी सुळे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
[My Mahanagar]भाजपकडे एवढे पैसे आले कुठून, नगरपरिष...
[Mumbai Tak]Supriya Sule यांच्याकडून लोकसभेत निलेश...