1 minute reading time
(88 words)
[TV9 Marathi]'नवले पुलावरील अपघात शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना करावी' : सुप्रिया सुळे
पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबर रोजी भीषण अपघाताची झाला होता. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता आणि 20 जण जबर जखमी झाले होते. एका कंटेनरने अनेक गाड्यांना ठोकर दिल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. या निमित्ताने नवले पूल पुन्हा चर्चेत आला होता. या पुलावर या आधीची अनेक अपघात झाले होते. त्यामुळे नवले पूल कसा अपघातमुक्त करता येईल, याची चर्चा सुरू होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले आहे.

